घटना :-
१९४२ - व्ही.
शांताराम ’प्रभात फिल्म कंपनी’तून बाहेर पडले.
१९१९ -
जालियनवाला बाग हत्याकांड – रौलेट
कायद्याच्या निषेधार्थ अमृतसर येथे झालेल्या सभेवर ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल हॅरी
डायर याच्या नेतृत्वाखालील तुकडीने केलेल्या गोळीबारात ३७९ लोक ठार व सुमारे १२००
लोक जखमी झाले. 
१८४९ - हंगेरी
प्रजासत्ताक बनले.
१७३१ - छत्रपती
शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन
असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला. 
जन्म :-
१९६३ - गॅरी
कास्पारॉव्ह – रशियन
बुद्धीबळपटू
१९५६ - सतीश
कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
१९०६ - सॅम्युअल
बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक 
१९०५ - ब्रूनो
रॉस्सी – 
इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक 
१९२२ - ज्यूलिअस
न्येरेरे – टांझानियाचे पहिले
राष्ट्राध्यक्ष 
१९४० - नजमा
हेपतुल्ला – राज्यसभा सदस्य
१८९५ - वसंत
रामजी खानोलकर – भारतातील
वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे 
१७४३ - थॉमस
जेफरसन – अमेरिकेचे ३ रे
राष्ट्राध्यक्ष
मृत्यू :-
२००८ - दशरथ
पुजारी – संगीतकार 
२००० - विश्वास
नरहर तथा ’बाळासाहेब’ सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक  
१९९९ - डॉ.
हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ
१९८८ - हिरामण
बनकर – महाराष्ट्र केसरी
१९७३ - बलराज
सहानी – अभिनेता व दिग्दर्शक 
१९७३ - अनंत
काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास
संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक
१९५१ - भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी
– औंध
संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार  
No comments:
Post a Comment