घटना :-
२००० - अभिनेत्री
सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.
१९५७ -
कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस.
नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१९५५ - प्रकृती
अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
१९४९ - भारत
स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली.
१९३० - २४१ मैल
प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.
१६७९ - राजारामास
पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन
प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर
जावे लागले.
१६६३ - दहा हजार
फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर
शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून
गेल्याने बचावला; मात्र पळुन
जाण्याच्या प्रयत्ना त त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.
जन्म :-
१९२० - डॉ. रफिक
झकारिया – महाराष्ट्राचे
नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य
१९२० - आर्थर
हॅले – इंग्लिश कादंबरीकार
१९१६ - ग्रेगरी
पेक – हॉलीवूड अभिनेता
१९०९ - अल्बर्ट
आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’
पटांचे निर्माते .
१९०८ - बाबू
जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक,
समाजसुधारक, राजकारणी
१८५६ - बुकर टी.
वॉशिंग्टन – अमेरिकन
समाजसेवक, लेखक, वक्ते व
शिक्षणतज्ञ
१८२७ - सर जोसेफ
लिस्टर – ब्रिटिश शल्यविशारद
मृत्यू :-
१९९८ - रुही
बेर्डे – चित्रपट व नाट्य
अभिनेत्री
१९९६ - भालचंद्र
नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना
पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक
१९९३ - दिव्या
भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री
१९६४ - गोपाळ
विनायक भोंडे – नकलाकार
१९४० - चार्लस
फ्रिअरी तथा दीनबंधू अॅीन्ड्र्यूज – समाजसेवक आणि
भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
१९२२ - पंडिता
रमाबाई – ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित
१९१७ - शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर
No comments:
Post a Comment