घटना-
१९९९ - आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील
शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड
१९९९ - आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे
तलावातील ’अभिरुची हॉटेल’ आगीत भस्मसात झाले.
१९९८ - परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट
विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९५ - बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत
निघाली.
१९८४ - ‘इन्सॅट-१-इ‘
हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय
उपग्रह राष्ट्राला समर्पित
१९७६ - वि. स. खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ
पुरस्कार प्रदान
१९२८ - बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात
घेण्याची सुरुवात झाली.
जन्म-
१९३७ - मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते,
दिग्दर्शक
१९२२ - मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता
१८७४ - सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ ’कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी
(सौराष्ट्र) कवी
१८६६ - हर्बर्ट डाऊ – अमेरिकन
उद्योगपती
१८२९ - लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक
१८०२ - व्हिक्टर ह्यूगो – जागतिक कीर्तीचे
फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक
१६३० - गुरू हर राय – शिखांचे ७ वे
गुरू
मृत्यू-
२०१० - चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य
२००४ - शंकरराव चव्हाण – केंद्रीय
अर्थमंत्री, गृहमंत्री आणि
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
२००३ - राम वाईरकर – व्यंगचित्रकार
२००० - बा. म. तथा ’रावसाहेब’
गोगटे – बेळगाव येथील उद्योगपती
१९६६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - क्रांतिकारक,
प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व
लेखक
१९३७ - एल. के. अनंतकृष्ण अय्यर – मानववंशशास्त्रज्ञ
१८८६ - नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक
१८७७ - मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व
शिक्षणतज्ञ
No comments:
Post a Comment