घटना-
२००४ - ’पुण्याची’
स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर
झाली.
२००३ - भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक
उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी
वाजपेयी यांची घोषणा.
१९६२ - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला
स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
१९५८ - ७,६०० पौंडाचा एक
हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने
कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
१९५२ - स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
१९४८ - गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक
झाली.
१९४५ - दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस
मॅकआर्थर मनिला येथे परतले.
१९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९१९ - चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची
स्थापना केली.
१७६६ - माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट
१६७० - सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची
आहुती दिली.
१२९४ - अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव
साम्राज्याचा अस्त झाला.
जन्म-
१९७६ - अभिषेक बच्चन – अभिनेता
१९३६ - बाबा महाराज सातारकर – कीर्तनकार
१९३३ - गिरीजा कीर – लेखिका आणि
कथाकथनकार
१९१४ - शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक
१९०५ - अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक,
विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते
१८४० - जॉन बॉईड डनलॉप – स्कॉटिश संशोधक
मृत्यू-
२०१० - सुजित कुमार – चित्रपट अभिनेता
व निर्माता
२००८ - महर्षी महेश योगी – योग गुरू
२००३ - गणेश गद्रे – ज्येष्ठ
गांधीवादी विचारवंत
२००० - कालिंदी केसकर – गायिका
१९२७ - हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी
शास्त्रीय गायक
१९२० - विष्णू
नरसिंह जोग - आळंदी
येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक
No comments:
Post a Comment