घटना :-
१९७८
- एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात
बेपत्ता झाली.
१९७२
- कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
१९५९
- क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
१९३५
- कोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अॅमकेडमी’चे (INSA) उद्घाटन
झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
१९२७
- न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
१९२२
- पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या
आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
१७८९
- अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी
झाले.
१६८०
- मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
जन्म
:-
१९७९
- बिपाशा बासू – अभिनेत्री
१९६१
- सुप्रिया पाठक – अभिनेत्री
१९४८
- शोभा डे – विदुषी व लेखिका
१९२८
- विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार
व साहित्यिक
१९२१
- चंद्रकांत गोखले – अभिनेते
१९२०
- सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका
१८९३
- जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना
मृत्यू
:-
२०००
- डॉ. अच्युतराव आपटे – स्वातंत्र्यसैनिक
१९८९ - मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
No comments:
Post a Comment