घटना :-
२०१० - भाषेबाबत
मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व
समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी
पुरस्कार' जाहीर
१९९९ -
पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.
१९९४ -
राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर
मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
१९७१ - झुल्फिकार
अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९४५ - मुंबई -
बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
१९४२ - दुसरे
महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता
शहरावर बॉम्बवर्षाव केला.
१९२४ - हिटलरची
लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
जन्म :-
१९४२ - राणा
भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
१९४० - यामिनी
कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व
कथ्थक नर्तिका
१९०१ - रॉबर्ट
व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन
पदार्थवैज्ञानिक
१८९० -
जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – झेक रसायनशास्त्रज्ञ
१८६८ - हार्वे
फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक
मृत्यू :-
२०१० - नलिनी
जयवंत – अभिनेत्री
२०१० - सुभाष
भेंडे – लेखक
१९९८ - बंगळुरू
वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे
फलज्योतिषी
१९९६ - कार्ल सगन
– अमेरिकन अंतराळतज्ञ व
लेखक
१९९३ - वामन
नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय
कीर्तीचे छायाचित्रकार
१९५६ - देबुजी
झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’
– कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष
सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
१९३३ - विष्णू
वामन बापट – संस्कृत विद्वान,
भाषांतरकार व शास्त्रसुधारक
१७३१ - छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा
महाराजा
No comments:
Post a Comment