घटना :-
२००० - थोर
समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र
सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात
आला.
१९९९ - जर्मनीची
लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’
या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९२ - अयोध्येत
कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
१९८१ - डॉ. एस.
झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून
भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून
रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली.
भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
१९७८ - स्पेनने
सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
१९७१ - भारताने
बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
१९१७ - फिनलँड
(रशियापासुन) स्वतंत्र झाला.
१८७७ - द
वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
जन्म :-
१९३२ - कमलेश्वर –
हिन्दी लेखक, पटकथालेखक
१९२३ - वसंत
सबनीस – लेखक व पटकथाकार
१९१६ - ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार
१८६१ - रेव्हरंड
नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक
१८५३ - हरप्रसाद
शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
१८२३ -
मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत
१७३२ - वॉरन
हेस्टिंग्ज – भारताचा पहिला
गव्हर्नर जनरल
१४२१ - हेन्री
(सहावा) – इंग्लंडचा राजा
मृत्यू :-
२०१३ - नेल्सन
मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९७६ -
क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक,
समाजसुधारक
१९७१ - कमलाकांत
वामन केळकर – भारतातील
भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
१९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
No comments:
Post a Comment