घटना :-
२००१ - राष्ट्रीय
एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील
बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान
करण्यात आला.
१९९९ - सरकारी
नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
१९९९ - चेक
प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.
१९९३ - मुंबई
येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी.
१९९२ -
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन
मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
१९९१ - जेजुरी
येथील खंडोबा मंदिरात चोरी
१९६८ - मॉरिशस
(इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला.
१९३० - ब्रिटिश
सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी
यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.
१९१८ - रशियाची
राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
१९१२ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात
केला.
जन्म :-
१९१३ - यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे
उपपंतप्रधान,
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
१९११ - दयानंद
बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’
बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री
१८९१ - ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते
१८२४ - गुस्ताव
किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
मृत्यू :-
२००१ - रॉबर्ट
लुडलुम – अमेरिकन लेखक
१९९९ - यहुदी
मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व
वाद्यवृंदसंचालक
१९४२ - रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि
उद्योजक
No comments:
Post a Comment